विद्यार्थ्यांना कौशल्याची जोड मिळाल्यास ते जीवनात यशस्वी होतील : प्रा.एस. टी.इंगळे


भालोद (25 फेब्रुवारी 2025) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या प्रचंड क्षमतांना कौशल्याची जोड मिळाल्यास ते जीवनात यशस्वी होतील. त्यातून त्यांचा व पर्यायाने राष्ट्राचा विकास होईल, असे प्रतिपादन कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यांनी केले. सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे पी.एम.उषा सॉफ्ट कंपोनंट अंतर्गत आयोजित विद्यार्थ्यांकरीता कौशल्य विकास कार्यक्रमावरील एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शिक्षणानंतर रोजगार प्राप्त होण्याची शक्यता असल्यास विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील व रोजगार निर्माण करणारे शिक्षण देणे हेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थात एनईपीचे मुख्य उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
पी.एम.उषा सॉफ्ट कंपोनंट अंतर्गत सुमारे 140 विविध विषयांवरील कार्यशाळांचे आयोजन संपूर्ण विद्यापीठ क्षेत्रातील ग्रामीण आदिवासी आणि शहरी भागांमध्ये छोट्या-मोठ्या महाविद्यालयातून हे उपक्रम राबविण्यात आले. यातून खर्‍या अर्थाने गरजू आणि अपेक्षित विद्यार्थ्यांपर्यंत या योजनांचा लाभ विद्यापीठ पोहोचवू शकले, असेही प्रा.एस.टी.इंगळे म्हणाले. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जगन्नाथ चौधरी होते. जीवनात व्यवसाय आणि रोजगारासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेबरोबर इतर अन्य अनुषंगिक अतिरिक्त पात्रता सुद्धा युवकांनी आत्मसात कराव्यात, असे चंद्रकांत चौधरी म्हणाले.



या मान्यवरांचे मार्गदर्शन
प्रमुख अतिथी म्हणून सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन लीलाधर विश्वनाथ चौधरी, सचिव नितीन वासुदेव चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.किशोर कोल्हे, उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी, कार्यशाळेचे समन्वयक डॉ.सुनील नेवे, विशेष वक्ता नाशिक एज्युकेशन अकॅडमीचे प्रा.सुरेश पांडे उपस्थित होते. प्रास्तासविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.किशोर कोल्हे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.मुकेश चौधरी व आभार डॉ.मीनाक्षी वाघुळदे यांनी मानले. कार्यशाळेमध्ये परिसरातील महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

चार सत्रात कार्यशाळा
या कार्यशाळेमध्ये एकूण चार सत्रांचे आयोजन करण्यात आले. आंतर वैयक्तिक कौशल्य (प्रा.सुरेश पांडे जळगाव), वेळेचे व्यवस्थापन (प्रा.सुरेश पांडे जळगाव), नेतृत्व विकास कौशल्य (प्रा.रवींद्र किनगे, मुक्ताईनगर), प्रभावी संवाद कौशल्य (प्रा.एस.ए.पाटील, ऐनपूर) यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. समारोपप्रसंगी प्रा.एस.ए.पाटील, प्रा.सुरेश पांडे, प्राचार्य प्रा.किशोर कोल्हे यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. एकूण 150 विद्यार्थी व विद्यार्थिनी कार्यशाळेला उपस्थित होत्या. प्रा.सुरेश पांडे यांच्या सत्राचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.जतीनकुमार मेढे यांनी तर समारोप समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.मीनाक्षी वाघुळदे तर आभार प्रा.राकेश चौधरी यांनी मानले.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
आयोजन समितीचे समन्वयक डॉ.सुनील नेवे, डॉ.जतीन मेढे, प्रा.मुकेश चौधरी, प्रा.राकेश चौधरी, डॉ.मीनाक्षी वाघुळदे, डॉ.पद्माकर सावळे, डॉ.व्ही पी पवार, प्रा. हेमंत इंगळे ,डॉ.किरण चौधरी, प्रा.चंद्रकांत वानखेडे, प्रा.मोहिनी तायडे, डॉ.गणेश चौधरी, डॉ.दिनेश पाटील, प्रा.काशीनाथ पाटील, डॉ.दिनेश महाजन, डॉ.मुकेश पवार, डॉ.दिगंबर खोब्रागडे, प्रा.गीतांजली चौधरी, प्रा.फाल्गुनी राणे, प्रा.कोमल सावळे, प्रा.भावना प्रजापती, प्रा.जान्हवी परतणे, प्रा.हेमलता कोल्हे, प्रा.शैलजा इंगळे, मोहिनी चौधरी, बाळकृष्ण चौधरी, किशोर चौधरी, पंकज नेहेते, तुळशीराम पाटील, कल्याण चौधरी, दिलीप इंगळे आदींनी परिश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !