धुळ्यातील प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांची टीका : म्हणाले, महाराष्ट्रात भ्रष्टाचाराला ऊत !


मुंबई (22 मे 2025) :महाराष्ट्र हा बोगस बियाण्यांचा अड्डा बनला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले असून पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण आत्महत्येचे नव्हे तर हत्येचे असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

महाराष्ट्र हा बोगस बियाण्यांचा अड्डा
विजय वडेट्टीवार गुरुवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र हा बोगस बियाण्यांचा अड्डा बनला आहे. यासंबंधी तुम्ही – आम्ही मिळून खाऊ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मी मागील अनेक वर्षांपासून या प्रकरणाला वाचा फोडत आहे. विधानसभेतही आम्ही हा प्रश्न वारंवार लावून धरला आहे. शेतकर्‍यांना बियाण्यांचे शुद्ध वाण मिळत नाही. याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत आहेत. सगळेजण मिळून हा सर्व प्रकार राजरोसपणे करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालावे. अन्यथा असाही महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यांत पुढे गेला आहे. पुन्हा त्याचा उच्चांक गाठू नये याची काळजी घेण्याची गरज आहे.





शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यांना माफी देऊ नका
सरकारने शेतकर्‍यांना अजूनही कर्जमाफी दिली नाही. यासंबंधी मंत्रिमंडळ बैठकीत थातुरमातूर चर्चा झाली. पण कोणताही ठोस निर्णय झाला नाही. अवकाळी पाऊसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. पण त्यावरही सरकारने कोणतेही भाष्य केले नाही. या प्रकरणी सरकार गंभीर असल्याचे दिसत नाही. आता बाजारात बोगस बियाणे येत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. याप्रकरणी कायद्यात दुरुस्ती करून बोगस बियाण्यांची विक्री करणार्‍यांवर किमान 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करावी. शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यांना कोणतीही माफी दिली जाऊ नये, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

महाराष्ट्रात भ्रष्टाचाराला ऊत
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी धुळ्यातील विश्रामगृहात सापडलेल्या पैशाच्या प्रकरणावरही भाष्य केले. राज्यात भ्रष्टाचाराला ऊत आला आहे. अधिकार्‍यांनी आमदारांना पैसे देण्यासाठी निधी गोळा केल्याचा आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. या प्रकरणी संबंधित जिल्ह्याची साफसफाई करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारीच विधिमंडळ समित्यांना काही विशेष सूचना केल्या होत्या. त्यानंतरही महाराष्ट्राच्या आमदारांवर असे आरोप होत असतील तर हा प्रकार अत्यंत अवमानास्पद व सहन न करण्यासारखा आहे.

विधानसभा व विधान परिषदेच्या अध्यक्षांनी विधिमंडळ समित्यांच्या दौर्‍यामुळे महाराष्ट्र बदनाम होत असेल, अधिकारी आपले पाप लपवण्यासाठी पैसे गोळा करून देत असतील, तर या समित्यांच्या दौर्‍यांवर योग्य तो निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !