!-- afp header code starts here -->

कर्जे महागणार नाहीत : आरबीआयकडून पतधोरण जाहीर

रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; ईएमआयही वाढणार नाही


Loans will not become more expensive : RBI announces monetary policy मुंबई (6 फेब्रुवारी 2026) : आरबीआयकडून पतधोरण जाहीर झाले असून त्यात रेपो रेटमध्ये कोणतेही बदल झाले नसल्याने कर्ज महागणार नसल्याचे तसेच ईएमआयही वाढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

रेपो रेट 5.25 वर
रेपो दरात बदल करण्यात आला नसून तो 5.25 वर ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ कर्जे अधिक महाग होणार नाहीत आणि तुमचे ईएमआय वाढणार नाहीत. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) डिसेंबरमध्ये व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी करून 5.25 टक्के केला. आरबीआय बँकांना ज्या दराने कर्ज देते त्याला रेपो दर म्हणतात. जेव्हा आरबीआय रेपो दर कमी करते तेव्हा बँकांना स्वस्त कर्ज मिळते आणि हा फायदा त्यांच्या ग्राहकांना मिळतो.

2025 मध्ये चार वेळा 1.25 टक्के कपात
फेब्रुवारी 2025 मध्ये व्याजदर 6.5 वरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला . चलनविषयक धोरण समितीने ही कपात जवळजवळ पाच वर्षांनी केली. एप्रिलमध्ये झालेल्या दुसर्‍या बैठकीतही व्याजदरात 0.25 टक्के कपात करण्यात आली. जूनमध्ये, आरबीआयने तिसर्‍यांदा 0.50 टक्क्यांनी दर कपात केली. डिसेंबरमध्ये 0.25 टक्के कपात केल्यानंतर व्याजदर 5.25 टक्क्यांपर्यंत घसरले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !