नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राज्यात पक्ष होणार बळकट
शहादा येथील सभेत गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दावा
शहादा : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत केलेल्या प्रवेशामुळे पक्षाला उत्तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात बळकटी मिळणार असून राष्ट्रवादी पक्ष अधिक मजबूत होणार असल्याचे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे केले. गृहमंत्री अनिल देशमुख हे नंदुरबार दौर्यावर असून शहादा येथे रविवारी सकाळी 10.30 वाजता लोणखेडा रस्त्यावरील पाटील मंगल कार्यालयात झालेल्या
सभेत ते बोलत होते. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी होती, मात्र अनेकांनी पक्ष सोडल्यामुळे पक्षाची ताकत कमी झाली मात्र आता पुन्हा पक्षाला बळकटी मिळणार आहे.
पाच वर्ष महाआघाडीचे सरकार टिकणार
गृहमंत्री म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. पाच वर्ष सरकारला कोणताही धोका. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.





