पाण्याच्या वादातून तरुणाचा खून


तळोदा तालुक्यातील गणेश बुधावलची घटना

तळोदा : हॅन्ड पंपवरून पाणी भरण्याच्या वादातून तालुक्यातील गणेश बुधावल येथे झालेल्या मारहाणीत अक्षय पाडवी (20) या तरुणाचा मृत्यूझाला. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पाणी भरण्यावरून वाद विकोपाला
तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल गावामधील महेंद्र शिड्या पाडवी (42) हे 28 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता त्यांच्या घरासमोर जवळच असलेल्या सार्वजनिक हॅण्डपंपावर पाणी भरण्यासाठी गेले असता अजय वळवी (रा.गणेश बुधावल) याने त्यांना पाणी भरण्याचे गेट बंद करून विरोध केला व तुम्ही रात्रभर झोपू देत नाही, तुम्हाला मारून टाकू अश्या धमक्या दिल्या व शिवीगाळही केली व याचवेळी अजय वळवी तसेच महिाल रामजी वळवी या दोघांनी संगनमत करून अजय वळवी याने त्याचे हातातील उलट्या कुर्‍हाडीच्या दांड्याने महेंद्र शिड्या पाडवी यांचा मुलगा अक्षय शिड्या पाडवी याच्या पोटावर जोरात ठोसा मारून गंभीर दुखापत केली व मारहाणीत अक्षय पाडवीचा मृत्यू झाला. या प्रकरणी महेंद्र शिड्या वळवी यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलिसात आरोपी अजय महिपाल वळवी, महिपाल रामजी वळवी (रा.गणेश बुधावल) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहा.निरीक्षक अविनाश केदार करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !