मोठी बातमी : एस.टी.कर्मचार्यांचा संप बेकायदेशीर : मुंबईतील कामगार न्यायालयाचा निर्वाळा
मुंबई : एस.टी.कर्मचार्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा मुंबईतील कामगार न्यायालयाने दिल्याने कर्मचार्यांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. एस.टी.महामंडळाकडून दाखल केलेल्या तक्रार अर्जावर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. एस.टी.ही लोकोपयोगी सेवा असतानादेखील सहा आठवडे अगोदर संपाची नोटीस न दिल्याने कोर्टाचा निर्वाळा दिला आहे.
निर्णयानंतर उडाली खळबळ
एस.टी.कर्मचार्यांनी केलेला हा संप बेकायदेशीर आहे. याकरता राज्यभरातील कामगार न्यायालयात जवळपास दीड महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केले आहेत. औद्योगिक विवाद कायद्यानुसार लोकोपयोगी सेवा असल्यास सहा आठवडे अगोदर संपाची नोटीस देणं बंधनकारक आहे परंतु एस.टी.महामंडळातील सध्या सुरू असलेल्या संपात कोणतीही कायदेशीर नोटीस देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी आज मुंबईतील वांद्रे येथील कामगार न्यायालयात एमआरटीयु अँड पीयुएलपी 1971 कायद्यातील 25 कलमानव्ये संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन हा संप बेकायदेशीर संप असल्याचा निर्वाळा देण्यात आला. या संदर्भातील अंतिम आदेश पारीत करण्यात आला आहे. त्याचा परीणाम कामगारांवर होणार्या कारवाया आणि संपावर होणार आहे.





अडीच महिन्यांपासून प्रवाशांचे हाल
गत अडीच महिन्यापासून सुरू असलेला एस.टी. कर्मचार्यांचा संप अद्यापही सुरू असल्याने प्रवासीवर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. एस.टी.विलीनीकरण शक्य नसल्याचे यापूर्वी सरकारने सांगितले आहे तर यायालयातून त्याबाबत समिती नेमून त्या समितीची भूमिका आम्ही मान्य करू, असे सरकारने सांगितले आहे.
