गिरीशभाऊ माझ्या आजारावर टीका केली म्हणून आव्हान दिले ! : आमदार एकनाथराव खडसे


Girishbhau, I have not talked about Kamrekhal yet ! : MLA Eknathrao Khadse जळगाव : माझ्या आजारावर टिका केली म्हणून मंत्री गिरीश महाजनांना आव्हान दिले मात्र आपण चुकीचे काहीही बोललो नाही मात्र भाजपाकडून गल्लोगल्ली माझा निषेध सुरू आहे. गिरीशभाऊ अजून तर मी कमरेखाली उतरलो नाही, अशी टिका आमदार एकनाथराव खडसे यांनी जळगावात केली. शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चानंतर ते सभेत बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील उपस्थित होते.

कापसासह केळीला भाव नाही
यावेळी आमदार खडसे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आल्याची आठवण सांगितली तर दहा वर्षानंतर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज सारथ्य केल्याचे सांगत इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. शेतकर्‍यांच्या मनातील भावना मोर्चानिमित्त समोर आली आहे. कापसाला भाव नाही, केळीला भाव नाही, अशी राज्यात स्थिती आहे. कापसाला 12 हजार रुपये भाव का नको? अशी विचारणा त्यांनी करीत कापसाला पाच हजार रुपये अनुदानाची मागणी केली.


जनता पाठीशी, सहानुभूतीची गरज नाही
आमदार खडसे म्हणाले की, गिरीश महाजन यांनी आपल्या आजारावर टिका केली होती. माझा आजार खोटा असल्यास मला जोडे मारा अन्यथा आजार खरे असल्यास मी जोडे मारणार, असे आव्हान गिरीशभाऊला दिले होते मात्र आजाराबाबतचे सर्व पुरावे आपण माध्यमांपुढे आणले. आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या सहानुभूतीची गरज नाही कारण जनता माझ्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.रोहिणी खडसेंसह पदाधिकारी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !