मुंबईतील भाईंदरसह नया नगरातील हिंसक संघर्षानंतर 24 तासात अतिक्रमणावर फिरवला जेसीबी


After the violent clashes in Naya Nagar with Bhayander in Mumbai, JCB turned on the encroachment within 24 hours मुंबई : युपीतील बुलडोझर बाबांप्रमाणे राज्य शासनानेही मुंबईतील भाईंदर आणि नया नगर येथे दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर तत्काळ अतिक्रमणावर जेसीबी फिरवण्यात आला आहे. नया नगर परिसर हा मुस्लिमबहुल भाग मानला जातो. येथील रस्त्यांवर अनेक बेकायदा बांधकामे व दुकानांनी अतिक्रमण केले आहे. मीरा रोड येथील हिंसाचारानंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी बेकायदेशीरपणे बांधलेल्या बांधकामांवर कारवाई करणार असल्याचे विधान केले होते.

यानंतर परीसरातील रस्त्याच्या कडेला उभारलेल्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझरचा वापर करण्यात आला. सर्व बेकायदा बांधकामे बुलडोझरच्या सहाय्याने पाडण्यात येत आहेत. फूटपाथवर बांधलेली बेकायदा दुकानेही तोडण्यात येत आहेत.



मात्र, या हिंसाचारात आरोपी असलेल्यांच्या घरावर किंवा दुकानांवर ही कारवाई करण्यात आलेली नाही. सर्व बेकायदा बांधकामे पाडण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. घटनेच्या 48 तासांच्या आत ही बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !