भुसावळकरांना मोठा दिलासा : अमृत योजनेच्या टप्पा दोनला मुंबईच्या बैठकीत अंतिम मंजुरी


Big relief for Bhusawalkars: Final approval for phase two of Amrit Yojana in Mumbai meeting भुसावळ : भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणार्‍या अमृत योजना टप्प्या दोनच्या प्रस्तावास मुंबई येथे गुरूवार, 1 रोजी दुपारी 3.30 वाजता झालेल्या नगरविकास विभागाच्या बैठकीत अंतीम मंजुरी मिळाली. प्रधान सचिव गोविंदराज या बैठकीच्या अध्यक्षतेस्थानी होते. ही योजना टेंडर निघाल्यावर 12 महिन्यात पूर्ण करायची आहे, यामुळे भुसावळकरांना या योजनेच्या माध्यमातून दररोज पाणीपुरवठा होणार आहे. यासाठी जलशुध्दीकरण केद्र, पंपिंग हाऊस, जॅकवेल हे नवीन यंत्रणा तयार केली जाणार आहे.

अमृत टप्पा दोनला अंतीम मंजुरी
केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानातंर्गत मंजूर अमृत योजनेच्या टप्पा दोनच्या संदर्भात गुरूवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, एमजीपीचे अधिकारी, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, पाणीपुरवठा अभियंता आदींची उपस्थिती होती. शहरास पाणी प्रश्न भेडसावत असून हा प्रश्न कायमचा दूर करण्यासाठी शासनाकडून केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानातंर्गत मंजूर अमृत योजनेच्या टप्पा दोनच्या पाणीपुरवठा योजनेवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत भुसावळ येथील पाणी पुरवठ्याचा आढावा घेऊन केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानातंर्गत मंजूर अमृत योजनेच्या टप्पा दोनवर चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती या योजनेला अंतीम मंजूरी बैठकीत देण्यात आली. आमदार संजय सावकारे यांनी या योजनेसाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. यास यश येऊन अखेर ही योजनेला मूर्त स्वरूप आले आहे. यापूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत अमृत योजना दोनमध्ये भुसावळ पालिकेचा समावेश नव्हता तो समावेश करून गुरूवारी त्यांस अंतीम मंजुरी प्राप्त झाली आहे. यामुळे हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे.


योजनेत अशी होणार कामे
गुरूवारी मुंबईत झालेल्या बैठकीत जोगलखोरी येथे विहिर, जॅकवेल, पंपिंग हाऊस बांधण्याबाबत चर्चा झाली. तेथून पाण्याची उचल करावी, तेथून उचल झालेल्या पाण्यावर ट्रामा केअर सेंटरजवळ जलशुध्दीकरण केंद्र निर्माण करून तेथे पाण्यावर प्रक्रीया होऊन पाणी वितरीत केले जाईल.

10 जलकुंभात पाणी पोहोचणार
शहरात बांधण्यात आलेल्या 10 जलकुंभात जलशुध्दीकरण केंद्रातून प्रक्रीया केलेले पाणी सोडले जाईल, त्या जलकुंभातूनच शहरातील विविध झोनमध्ये नळांद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. ज्या भागात पाईप लाईन नाही, त्या भागात पाईप लाईन टाकली जाणार आहे. ज्या जलकुंभांना पाईप जोडले नाही, त्यांनाही पाईप-लाईन जोडली जाणार आहे.

अमृत योजना एकचे काम चार महिन्यात पूर्ण होणार
शहरात अगोदरच सुरू असलेले अमृत योजनेचे काम येत्या चार महिन्यात पूर्ण करण्यावर चर्चा झाली. हे काम चार महिन्यात पूर्ण करून तत्काळ अमृत योजना 2 या कामाला सुरूवात होणार आहे. उर्वरीत काम येत्या चार महिन्यात पूर्ण करून अमृत योजना 1 चे काम पूर्ण करून द्यायचे आहे.

एक वर्षात अमृत योजना दोनचे काम पूर्ण
शहरात अमृत योजना 2 चे कामाचे ट्रेंडर निघाल्यानंतर हे काम येत्या 12 महिन्यात पूर्ण करावयाचे आहे, पालिकेने पाण्याचा स्त्रोत निश्चित झाला आहे. त्यामुळे कामाला गती देऊन अमृत योजना 2 हे काम वेळेत पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी दिली.

प्रयत्नांना आले यश : आमदार
शहरातील पाणी प्रश्न मिटावा यासाठी शासनाकडे अमृत योजना दोनसाठी पाठपुरावा केला होता. त्यास यश आले आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानातंर्गत मंजूर अमृत योजनेच्या टप्पा दोनला मिळालेल्या अंतीम मंजूरीमुळे भविष्यात शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे भुसावळचे आमदार संजय सावकारे म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !