मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात संततधार पावसाचा इशारा


मुंबई (17 जून 2025) : दक्षिण-पश्चिम मान्सूनने यंदा महाराष्ट्रात वेगाने आगेकूच करत अवघ्या आठवड्याभरात संपूर्ण राज्य व्यापले आहे. कोकणापासून ते विदर्भ पर्यंत आणि घाटमाथ्यापासून मराठवाड्याच्या पठारापर्यंत सर्वच विभागांत पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात संततधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने आजपासून उद्यापर्यंत कोकण व मध्य महाराष्ट्रात यलो ते ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


कोकण विभागात सर्वात आधी मान्सून दाखल होतो. यंदाही त्याला अपवाद नाही. मान्सूनचा सर्वप्रथम प्रवेश केरळ मार्गे झाला आणि त्यानंतर तो गोवा ओलांडून 9 जूनच्या सुमारास सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचला.

नाशिक, पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ही मान्सूनचा प्रभाव जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून काही भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राधा नगरी व पंचगंगा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये गंगापूर धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव भागात शेतकर्‍यांनी पेरण्या सुरू केल्या असून कृषी विभागाने काळजीपूर्वक टप्प्याटप्प्याने पेरणीचा सल्ला दिला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !