जळगावात राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा : दिल्लीचा अरिहत कपिल सातव्या फेरीपर्यंत अव्वल

राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील खेळाडूंच्या पालकांशी निशा जैन यांचा संवाद ; दुसर्‍या सत्राची ऐश्वर्या रेड्डी यांच्याहस्ते सुरवात


National Chess Championship in Jalgaon : Delhi’s Arihat Kapil tops till the seventh round जळगाव (6 ऑगस्ट 2025) : शहरातील जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरु असलेल्या 38 वी राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा सातव्या फेरीपर्यंत अटितटीत आली आहे. दिल्लीचा अरिहत कपिल याने पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत सात पैकी सात सामने जिंकून मुलांमध्ये अव्वल स्थानावर आघाडी घेतली आहे. अरिहत कपिल ने महाराष्ट्राच्या अविरत चौहान याला धक्कादायक पद्धतीने नमविले. त्यामुळे त्याला एकल बढत घेता आली. दुसर्‍या पटावर तेलंगणाचा इशान कंदी व पश्चिम बंगालचा नरेंद्र अग्रवाल यांच्यात बरोबरीत सामना झाला. महाराष्ट्राच्या अद्वित अग्रवाल याने ओणीक्षूक मंडल यांच्यामध्ये बरोबरीत सामना झाला.

मुलींच्या गटात सहा गुणांसह सात खेळाडूंचे वर्चस्व
392 मुलं व 177 मुलींचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील मुलींच्या गटात पहिल्या बुद्धिबळ पटावर दिवी बिजेस आणि जानकी एस डी दोघं केरळ यांच्या अटितटीचा सामना होऊन बरोबरीत झाला. झारखंडची दिशीता डे हिने आरध्या दास त्रिपूरा हिच्यासोबतचा सामना बरोबरीत झाला. महाराष्ट्राची क्रिषा जैन व भूमिका बांधले यांच्यात तिसर्‍या पटावर सामना रंगला त्यात क्रिषा जैनने बाजी मारली. सुमिता पुनगावन तेलंगणा हिने मान्या ड्रोलिया गुजरात हिला नमवून आपले वर्चस्व कायम ठेवले. महाराष्ट्राची प्रिशा घोलप हिने कर्नाटकची नक्षत्रा गोमूदवेली हिला नमविले. मुलींच्या गटात सहा गुणांसह सात खेळाडू आघाडीवर आहेत.






आजच्या सकाळच्या सत्रात अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन यांनी सांगितले की, तुम्ही विविध ठिकाणांवरुन येथे आला आहात. खेळताना विजय आणि पराभवाचा विचार करु नका. खेळाचा पुरेपुरे आनंद घ्या. फक्त खेळताना आपले शंभर टक्के योगदान द्या. असा खेळाडूंशी संवाद साधला. यानंतर पालकांशी व्यवस्थेविषयी चर्चा केली. राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेनिमित्त करण्यात आलेल्या व्यवस्थेविषयी पालकांनी समाधान व्यक्त करीत जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसराचे कौतूक केले. यानंतर पालकांनी अनुभूती स्कूल ला सुद्धा भेट दिली.

दुपारचे सत्र ऐश्वर्या रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आले. यावेळी बौद्धिक एकाग्रता वाढविण्यासाठी बुद्धिबळ खेळ खूप मोलाचा असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे मिडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, नाशिकचे वरिष्ठ प्रशिक्षक सुनील शर्मा, पंच दीपक चौहान, पुण्याच्या जुईली कुलकर्णी उपस्थित होत्या.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !