खेळाडूंनी जय व पराजय पचवावा : भुसावळ शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे
कबड्डी स्पर्धेत रा.धो. माध्यमिक विद्यालय व महात्मा गांधी विद्यालय विजयी
Players should digest victory and defeat: Bhusawal City Police Inspector Uddhav Damale भुसावळ (9 सप्टेंबर 2025) : पोलिस निरीक्षक डमाळे म्हणाले की, खेळाडूंनी पराभवाने खचून न जाता पुन्हा विजयाच्या दृष्टीने प्रयत्न करावे कारण जय-पराजय हा खेळाडूंना पचवता आला पाहिजे. अभ्यासाबरोबरच खेळाला सुद्धा महत्त्व आहे, असे पविचार भुसावह शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग, भुसावळ व बियाणी एज्युकेशन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये 14 वर्षाआतील व 19 वर्षातील मुलांच्या कबड्डी स्पर्धा झाल्या. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भुसावळ शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे बोलत होते. अध्यक्षस्थानी भुसावळ तालुका शालेय पोषण आहार अधीक्षक बी.डी.धाडी होते.
यांची होती उपस्थिती
प्रमुख अतिथी म्हणून बियाणी एज्युकेशन ट्रस्टच्या सचिव डॉ.संगीता बियाणी, शाळेचे प्राचार्य डी.एम.पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष तालुका समन्वयक डॉ.प्रदीप साखरे, क्रीडा भारतीचे विभागीय सचिव बी.एन.पाटील, प्रभाकर बोरसे यांच्यासह क्रीडा शिक्षक प्रशिक्षक, खेळाडू, पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.





निरीक्षक उद्धव डमाळे व बी.डी.धाडी यांच्याहस्ते प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत मेजर ध्यानचंद व मामा बियाणी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीप प्रज्वलन व क्रीडांगण पूजन करून उद्घाटन करण्यात आले.
क्रीडा स्पर्धांमुळे खेळाडूंचा सर्वांगीण विकास
बी.डी.धाडी म्हणाले की, अभ्यासाबरोबरच खेळाला विद्यार्थ्यांनी तेवढेच महत्त्व दिले पाहिजे. क्रीडा स्पर्धांमुळे खेळाडूंचा सर्वांगीण विकास होतो. खेळाडूंच्या अंगी समय सूचकता येत असते यातूनच भारताचा सुजाण नागरिक तयार होतो.
स्पर्धेचा निकाल असा
अंतिम सामना राजाराम धोंडी विद्यालय विरुद्ध महाराणा प्रताप विद्यालय यांच्यात झाला. यात 20 गुणांनी राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय कुर्हे पानाचे हा संघ विजयी झाला.
महाराणा प्रताप विद्यालय, भुसावळ द्वितीयस्थानी राहिला. तृतीय स्थानी पंडित नेहरू विद्यालय, वराडसीमचा संघ राहिला.
19 वर्षातील मुलांच्या सामन्यात अंतिम सामना महात्मा गांधी विद्यालय विरुद्ध के.नारखेडे विद्यालय, भुसावळ यांच्यात झाला. यात महात्मा गांधी विद्यालय वरणगाव 27 गुणांनी विजयी झाले तर के.नारखेडे विद्यालय भुसावळचा संघ उपविजेता राहिला.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
पंच म्हणून बी.एन.पाटील, नयन सागर, मनी राजू कुलकर्णी, नम्रता गुरव, काजल बारोट, गजानन पाटील, प्रदीप महाजन, मुकेश मोरे, वंदना ठोके, विलास पाटील, राजपूत, चव्हाण, हिंमत पाटील, सुनील चौधरी यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी डॉ.प्रदीप साखरे, लक्ष्मीकांत नेमाडे, हिंमत पाटील, यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक व बियाणी मिलिटरी स्कूलचे कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले.
