…तर यावल शहरावरील जलसंकट दूर होणार


नगराध्यक्षा सुरेखा कोळी : प्रस्तावीत दोन कामांना मंजुरीची प्रतीक्षा

यावल- शहरातील लोकसंख्या जवळपास पन्नास हजारांवर पहोचली असून शहरातील पाणी समस्येवर मार्ग काढण्यात प्रशासनास यश मिळाले आहे. यासाठी शहराच्या विस्तारीत क्षेत्रासह विविध योजना प्रस्तावीत केल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा शरद कोळी यांनी दिली.

प्रस्तावीत कामांना शासन मान्यता व निधी मिळाल्यास पाणीप्रश्‍न सुटणार
नगराध्यक्षा सुरेखा कोळी शहराच्या पाणीपुरवठा संदर्भात म्हणाल्या की, नागरीकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा हाच आमचा दृष्टीकोण आहे. यासाठी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या साठवण तलावासाठी उन्हाळ्यात पाणीटंचाईला यावलकर सामोरे जावु नये म्हणुन तीन कोटी रुपयाच्या खर्चाचे दुरुस्ती प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले तसेच नगरपरीषद कार्यक्षेत्रातील विस्तारीत भागातील जवळपास दहा कॉलन्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंत पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात दोन वर्षापूर्वी युध्दपातळीवर प्रयत्न करून शासनाकडुन वैशिष्टपुर्ण योजनेतून 10 लाख लीटर पाण्याची साठवण क्षमता असलेल्या जलकुंभासाठी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करून हे पूर्ण केले आहे. गत मार्च महिन्यात नगरपरीषदेने या जलकुंभात दहा लाख लिटर पाण्याची साठवण केली आहे. हे जलकुंभाचे काम हे अपूर्ण असल्याने नगर परीषदेने जलकुंभ हस्तांरीत केले नसल्याचे त्यांनी सांगिले. या जलकुंभातुन विस्तारीत भागातील जवळपास सुमारे सात हजारांवर असलेल्या लोकवस्तीला या जलकुंभातुन स्वच्छ, सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी नगर परीषदेद्वारे या जलकुंभाला पाईपलाईन जोडणीसाठी शासनाकडे सुमारे तीन कोटी 50 लाखांच्या खर्चाचा अपेक्षीत आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला असून त्यास मान्यता मिळाल्यास पाईपलाईन जोडणीस तात्काळ कार्यरंभ करण्यात येईल. या दोघा प्रस्तावीत कामांना शासनाची मान्यता व निधी उपलब्ध झाल्यास यावल शहरातील पिण्याच्या पाण्याचा संकट कायमचा मार्गी लागेल, असा विश्वास पत्रकारांशी बोलतांना नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी व्यक्त केला.


कॉपी करू नका.