राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा : दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ


नागपूर : अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या राज्यातील शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकर्‍यांचे 30 सप्टेंबर 2019 पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विधानसभेत केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे नाव या योजनेला देण्यात आले आहे.

14 व्या अधिवेशनाचे वाजले सूप
शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार रुपये ते मंत्रिमंडळाचा विस्तारादरम्यान असलेल्या अनेक सामाजिक, राजकीय व आर्थिक मुद्यांवर चौफेर चर्चा झडलेले राज्याच्या निवनियुक्त 14 व्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी नागपुरात सूप वाजले. केंद्राने जारी केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतचा जनमानसातला संभ्रम व रोष देशभरात तीव्र होत असताना त्याचे पडसाद या अधिवेशनातही उमटलेले दिसले.


कॉपी करू नका.