शेतकर्‍यांच्या हक्कासाठी आमदार अमोल जावळे विधानसभेत आक्रमक


रावेर (3 जुलै 2025) : रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या नुकसानीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रभावीपणे मांडला.

शेतकर्‍यांना मदत देण्याची भूमिका सरकारची असली तरी, कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून होणार्‍या पत्रव्यवहारात मोठ्या प्रमाणावर दिरंगाई होते. यामुळे नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही आणि शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, असे त्यांनी सभागृहात स्पष्टपणे सांगितले.








जून- जुलै 2023 मध्ये झालेल्या वादळात अनेक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र, संबंधितांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

तसेच, नुकतेच 29 जून 2025 रोजी झालेल्या वादळात सुमारे 900 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारकडे मागणी केली की, या नुकसानीची तातडीने दखल घेऊन शेतकर्‍यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !