नववर्ष स्वागतप्रसंगी व्यसनमुक्त समाज घडवण्याचा संकल्प करावा


पोलिस निरीक्षक दिलीप भागवत : बाजारपेठ पोलिस ठाण्यात बैठक

भुसावळ : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत मद्य प्राशन न करता दूध पिऊन वा नवीन संकल्प करून करूया आणि नववर्षाच्या स्वागताला सर्वानी व्यसनमुक्त समाज घडवण्याचा संकल्प करावा असे आवाहन बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी केले. आर्या फौंडेशन, भुसावळ पोलिस विभाग, भुसावळ शहर पत्रकार संघटना, सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था व भुसावळ रीक्षा चालक मालक संघटना, राष्ट्रीय मजदूर युनियन, अश्विन सागर फौंडेशन,यांच्या संयुक्त विद्यमाने सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत व्यसनमुक्त जीवन जगण्याच्या संकल्पाने करू, या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर हा मद्याच्या धुंदीत न घालवता मद्याऐवजी दूध प्या आणि शरीर सुदृढ ठेवा ही संकल्पना राबविण्यात येत असून या निमित्त शनिवारी दुपारी 12 वाजता बाजारपेठ पोलिस ठाण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी सहाय्यक निरीक्षक सारीका खैरनार, आर्या फौंडेशनच्या संचालिका डॉ.वंदना वाघचौरे, पत्रकार शेख सत्तार, पत्रकार उज्वला बागुल, अश्विन सागर फौंडेशनचे संचालक अरुण तायडे, सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष राजेश्री नेवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

व्यसनमुक्त समाज घडणे गरजेचे
पोलिस निरीक्षक भागवत यांनी सर्व रीक्षा चालक-मालकांसह उपस्थितांना 31 डिसेंबर कसा साजरा करावा या विषयावर मार्गदर्शन केले तसेच नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र प्रमुख डॉ.वंदना वाघचौरे यांनी दारूचे दुष्पपरीणाम सांगितले तसेच पत्रकार शेख सत्तार यांनी व्यसनमुक्ती ही काळाची गरज असल्याचे पटवून दिले. लोकशाहीच्या उपसंपादक उज्वला बागुल यांनी लहान मुलं ही व्यसनाधीन होत आहेत ही गंभीर बाब असून समाजातील प्रत्येक घटकाने या कडे दुर्लक्ष करू नये याकरीता असे उपक्रम व जनजागृती आवश्यक असल्याचे सांगितले. व्यसनमुक्त समाज घडविन्यासाठी संघटित होऊन या उपक्रमास सर्वानी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. सखी श्रावणीच्या राजेश्री नेवे यांनी मद्यामुळे परीवार कसा उद्धवस्त होत असल्याचे सांगितले.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी जी.आर.पी.रीक्षा स्टाफचे अध्यक्ष राजेंद्र देवमुठे, साबीर शेख, सादीक शे.हसन, एजाज खान, मेहबूब पहेलवान, माजीद खान, नासीर शेख जाफर, शरीफ गणी, कालीपिली रीक्षा युनियनचे समाधान पाटील यांच्यासह पत्रकार कलीम पायलट, गोपी म्यांद्रे, कमलेश चौधरी, इकबाल शेख , विविध संघटनां पदाधिकारी व सदस्य बैठकीस उपस्थित होते.

जनजागृतीपर विशेष कार्यक्रम
28 डिसेंबर रोजी रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ दुपारी चार वाजता जनजागृती होण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बैक यशस्वीतेसाठी आर्या फौंडेशनच्या मॅनेजमेंट टीमच्या सुवर्णा सुरेश इंगळे, प्रशांत निकम, वैशाली सावळे, मालती येवले, पोलिस कर्मचारी नंदू सोनवणे, नाले व पत्रकार संघांच्या पदाधिकार्‍यांनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.