रेल्वे सुरक्षा बलाच्या मिशन जीवन रक्षकने वाचवले 13 प्रवाशांचे प्राण


भुसावळ : मध्य रेल्वेतील भुसावळ विभागात आरपीएफतर्फे मिशन जीवन रक्षकच्या माध्यमातून 13 प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. संपूर्ण मध्य रेल्वेतील पाचही विभागात 66 जणांचे प्राण वाचवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रसंगी आरपीएफ जवानांनी जीव धोक्यात घातला होता.

भुसावळ विभागात 13 प्रवाशांना जीवदान
मध्य रेल्वेच्या नागपूर, भुसावळ, मुंबई, सोलापूर, पुणे या पाच विभागात रेल्वे सुरक्षा बलातर्फे मिशन जीवन रक्षकही संकल्पना राबविण्यात आली. या योजनेत आरपीएफ जवानांनी जीव धोक्यात घालून भुसावळ विभागात 13 प्रवाशांचे प्राण वाचविले. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स कर्मचारी कामात नेहमीच आघाडीवर असतात आणि केवळ रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठीच नव्हे तर जीव वाचवणारे, पळून गेलेल्या मुलांचे रेस्क्यूअर्स आणि लगेज रिट्रीव्हर अशा अनेक भूमिका बजावत असतात. एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत, मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी मिशन जीवन रक्षक चा एक भाग म्हणून काही वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून 66 जणांचे प्राण वाचवले. यामध्ये मुंबई विभागात 19, भुसावळ विभागात 13, नागपूर विभागात 14 आणि सोलापूर विभागात पाच पुणे विभागात 15 जणांचा समावेश आहे. आरपीएफच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा सामना करतात. रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य उद्देश असलेल्या अमानत या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आहे. त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, यासारख्या मौल्यवान वस्तू, प्रवाशांचे दागिने रोख आदी परत मिळवून दिले आहेत.



भुसावळात 50 लाखाचे साहित्य परत
एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या आर्थिक वर्षात, ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत, आरपीएफने सुमारे 857 प्रवाशांचे दोन कोटी 77 लाख रुपयांचे सामान परत मिळवून प्रवाशांना दिले. या 857 प्रवाशांपैकी 377 प्रवाशांचे एक कोटी 63 लाख रुपयांचे सामान एकट्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परत मिळवण्यात आले. या सामान पुनर्प्राप्ती प्रकरणांमध्ये बॅग, मोबाईल फोन, पर्स, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. भुसावळ विभाग 182 प्रवाशांचे 50 लाख 45 हजार रूपये, किमतीचे सामान; नागपूर विभाग 168 प्रवाशांचे 36 लाख 97 हजार रुपये किंमतीचे सामान, पुणे विभाग 58 प्रवाशांचे 13 लाख 94 हजार रुपये किंमतीचे सामान तर सोलापूर विभाग 72 प्रवाशांचे 13 लाख 99 हजार रुपये किंमतीचे सामान परत करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !