‘गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीत आता सर्वच शाळांमध्ये बंधनकारक !


मुंबई (6 ऑगस्ट 2025) : ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आता सर्वच शाळांमध्ये गाणे बंधनकारक करण्यात आले असून जी शाळा याची अंमलबजावणी करणार नाही त्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.

मराठी शाळेत राष्ट्रगीत आणि राज्यगीत मानवंदनेने गायलं गेलं पाहिजे. मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमाच्या शाळेतही राष्ट्रगीतानंतर गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं बंधनकारक आहे असा आदेश देण्यात आला आहे.






पूर्वी इयत्ता चौथी आणि सातव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा होत होती. त्यानंतर पाचव्या आणि आठव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. मात्र, आता यानंतर इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा संकल्प दादा भुसे यांनी व्यक्त केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !