जळगाव जिल्ह्यात 51 महसूल मंडळातील केळी उत्पादकांना मिळणार भरपाई


जळगाव : केळी उत्पादकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. केळी उत्पादकांना अति तापमानात जर सलग तीन दिवस 45 अंश तापमान राहिले तर त्यांना नुकसान भरपाई शासन देते. यंदा तापमानाच्या निकषात जिल्ह्यातील 51 महसूल मंडळे पात्र ठरली असून सलग पाच दिवस 45 अंश तापमान राहिल्याम ळे 51 महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकरी 43 हजार 500 रुपयांच्या नुकसान भरपाईच्या रक्कमेसाठी पात्र ठरले आहेत.

या आधी एप्रिल महिन्याच्या जास्त तापमानाच्या निकषात 75 महसूल मंडळ पात्र ठरले होते. कमी तापमानाच्या निकषात 36 महसूल मंडळ 26 हजार 500 रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी पात्र ठरले आहेत.

पात्र महसूल मंडळे अशी
जळगाव तालुक्यातील असोदा, नशिराबाद, भोकर, म्हसावद, पिंप्राळा.
भडगाव तालुक्यातील भडगाव, कोळगाव. चाळीसगाव तालुक्यातील खडकी बू., शिरसगाव धरणगाव तालुक्यातील धरणगाव, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद. एरंडोल तालुक्यातील एरंडोल, कासोदा, रिंगणगाव, उत्राण गृह. अमळनेर तालुक्यातील अमळनेर, अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरूड, वावडे. पाचोरा तालुक्यातील कु-हाड बु., पाचोरा, पारोळा तालुक्यातील बहादरपूर, पारोळा, शेळावे, तामसवाडी. भुसावळ तालुक्यातील वरणगाव, चोपडा तालुक्यातील चोपडा, अडावद, चहार्डी, गोरगावले, हातेड बु., लासुर. जामनेर तालुक्यातील जामनेर, नेरी बु., शेंदुर्णी. मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हे, मुक्ताईनगर, रावेर तालुक्यातील ऐनपुर, खानापूर, खिर्डी बु., खिरोदा,

केळी उत्पादकांना मिळणार भरपाई
यंदा जिल्ह्यात प्रचंड उष्णतेची लाट होती. विशेष करुन एप्रिल मे महिन्यात
तापमान प्रचंड वाढले. मे महिन्यात तापमान 45 व अंशापर्यंत गेल्यामुळे केळीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. केळीचे नुकसान झाले. सलग पाच दिवस तापमानाचा पारा 45 अंशापेक्षा वर गेल्यामुळे जिल्ह्यातील 51 महसूल मंडळ हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजनेतंर्गत जास्त तापमानाच्या निकषात पात्र ठरली आहेत. त्यामुळे या महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी 43 हजार 500 रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम मिळणार असल्याचे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.


कॉपी करू नका.