मध्य रेल्वेने प्लॅटिनम जयंती वर्षात केला प्रवेश
भुसावळ : जीआयपी रेल्वेची उत्तराधिकारी असलेल्या मध्य रेल्वेने 5 नोव्हेंबर रोजी प्लॅटिनम जयंती वर्षात प्रवेश केला. आशियातील (आणि भारतातील) पहिली ट्रेन मुंबई आणि ठाणे दरम्यान शनिवार, 16 एप्रिल 1853 रोजी दुपारी 3.35 वाजता धावली होती तर या दिवसाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. बोरी बंदर येथून निघणार्या स्थानकांत लोकांचा जमाव होता, किल्ल्याच्या तटबंदीवरून बॅन्ड वाजविण्यात आला, गनमधून गोळ्या उडविण्यात आल्या, सिग्नल झाल्यावर जेव्हा छोटी गाडी तीन इंजिनांसह लहान लाकडी स्थानकातून बाहेर पडली तेव्हा भारतातील रेल्वे युगाची पहाट झाली होती.
दररोज साडेचार दशलक्ष प्रवास करतात प्रवास
जसजशी वर्षे गेली तसतसे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचा विस्तार झाला. 1900 साली जी.आय.पी. रेल्वे कंपनीमध्ये, भारतीय मिडलँड रेल्वे कंपनीचे विलीनीकरण झाले. तेव्हा उत्तरेकडे दिल्ली, ईशान्येकडे कानपूर आणि अलाहाबाद आणि पूर्वेकडे नागपूर तर दक्षिण-पूर्वेत रायचूरपर्यंत विस्तार करण्यात आला. मुंबई येथून भारताच्या जवळजवळ सर्व भागात संपर्क तयार करण्यात आला. जी.आय.पी. चा मायलेज रेल्वेमार्ग त्यावेळी 1600 (2575 किलोमीटर) होता. 5 नोव्हेंबर 1951 रोजी निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि धौलपूर राज्य रेल्वे एकत्रीत करीत मध्य रेल्वेची स्थापना जीआयपी रेल्वेने केली. मध्य रेल्वे उपनगरीय रेल्वे नेटवर्कने मुंबई शहराच्या सामाजिक-आर्थिक वाढीसाठी अग्रगण्य भूमिका बजावली आहे आणि भारतातील द्रुतगती परीवहन प्रणालीच्या आगमनाची नोंद देखील केली आहे. त्यानंतर मध्य रेल्वेने मोठी प्रगती केली आहे आणि आता त्याचे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधून चार हजार 151.93 किलोमीटर अंतराचे जाळे आहे. मध्य रेल्वेचे मुंबई उपनगरी नेटवर्क हे दररोज अंदाजे साडेचार दशलक्ष प्रवासी वाहून नेणारे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे.
सोलापूर विभाग मध्य रेल्वेत विलीन
ऑक्टोबर 1966 मध्ये मध्य रेल्वेतील सोलापूर विभाग आणि दक्षिण रेल्वेतील सिकंदराबाद, हुब्बळी, विजयवाडा या विभागांना विलीन करून दक्षिण मध्य रेल्वे या आणखी एका रेल्वेची स्थापना करण्यात आली. 2 ऑक्टोबर 1977 रोजी सोलापूर विभाग मध्य रेल्वे ध्ये विलीन झाला आणि दक्षिण रेल्वेतील गुंटकल विभाग दक्षिण मध्य रेल्वेमध्ये समाविष्ट करण्यात आला. नंतर 2003 मध्य, आणखी सात झोन तयार करण्यात आले. ज्यात मध्य रेल्वेच्या जबलपूर आणि भोपाळ विभागांचा पश्चिम मध्य रेल्वेमध्ये समावेश करण्यात आला आणि मध्य रेल्वेचा झाशी विभाग उत्तर-मध्य रेल्वेमध्ये समाविष्ट करण्यात आला. आजच्या तारखेला मध्य रेल्वेचे 5 विभाग आहेत ज्यामध्ये मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर, पुणे या विभागांत 466 स्थानकांचे नेटवर्क आहे. सध्या कोरोना साथीच्या विरोधात लढा देताना मध्य रेल्वे देशाच्या विविध भागात पुरवठा साखळी सुनिश्चित करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे

