राहुरीतील पत्रकाराची अपहरण करून हत्या


अहमदनगर : चारचाकीतून आलेल्या संशयीतांनी पत्रकाराचे आधी अपहरण करीत त्यांचे नंतर त्यांची हत्या केल्याचा प्रकार राहुरीत उघड झाली. पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. राहुरी परिसरातील मल्हारवाडी रस्त्यावरून मंगळवारी दुपारी स्कार्पियोमधून आलेल्या काही जणांनी दातीर यांचे अपहरण केले होते. बुधवारी सकाळी दातीर यांचा मृतदेह राहुरी कॉलेज परीसरात आढळून आला. दातीर यांची हत्या कोणी व कशासाठी केली हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. दरम्यान श्रीरामपूर येथील व्यापार्‍याचे अपहरण करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका पत्रकारांचे अपहरण करुन हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 


कॉपी करू नका.