भुसावळात नागरिकत्व विधेयक कायदा रद्दसाठी साखळी उपोषण


संविधान बचाओ समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन

भुसावळ : सुधारित नागरिकत्व कायद्याला तीव्र विरोध दर्शवित नागरिकत्व दुरुस्ती कायदा (एनआरसी व सीएएरद्द कराअशी मागणी संविधान बचाओ समितीने केली आहेयासंदर्भात समितीने बुधवारपासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहेकायदा रद्द करावा या मागणीसाठी तहसीलदारांशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले भारताने लोकशाही स्वीकारली असूनदेशातील सर्व जातीधर्मांच्या नागरिकांना समान अधिकार आहेतघटनेने नागरिकांना लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहेमात्रसुधारित नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन दिल्ली पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केलासरकारने आणलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा घटनाबाह्य आहेतरी हा कायदा रद्द करण्यात यावाअशी मागणी संविधान बचाव समितीने केली आहेया मागणीसाठी बुधवारपासून तहसीलसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहेयावेळी हाजी सलीम चुडीवालेकाँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुन्नवर खानफिरोज शेखमाजी नगरसेवक साबीर शेखजुनेद खानमजहर शेखअजहर शेखजुलेद खाननाजीम कादरीशेआरिफशेइद्रीस बागवानसलीम खानसरदार उस्मान पिंजारीडॉइमरान खानअसलम खानयुसुफ खानराजू चौधरीअसलम खान आदीं उपस्थित होते





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !