प्रवाशांना दिलासा : एलटीटी-सुलतानपूर विशेष गाडीच्या 16 फेर्या

Relief for passengers: 16 trips of LTT-Sultanpur special train भुसावळ (25 एप्रिल 2025) : मध्य रेल्वेने उन्हाळी गर्दीचा प्रवाशांचा जागेचा ताण कमी करण्यासाठी एलटीटी (लोकमान्य टिळक टर्मिनस) मुंबई ते सुलतानपूर दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित गाड्यांव्यतिरिक्त ही गाडी धावणार आहे. या गाडीच्या एलटीटी-सुलतानपूर दरम्यान 16 फेर्या होतील.
एलटीटी-सुलतानपूर-एलटीटी (साप्ताहिक) विशेष गाडी क्रमांक 04211 ही 6 मे ते 24 जून दरम्यान प्रत्येक मंगळवारी दुपारी 4 वाजून 35 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 11 वाजता सुलतानपूर येथे पोहोचेल. या गाडीच्या एकूण आठ फेर्या होतील. तर गाडी क्रमांक 04212 विशेष गाडी 5 मे ते 23 जून दरम्यान प्रत्येक सोमवारी पहाटे चार वाजता सुलतानपूर येथून सुटेल आणि दुसर्या दिवशी दुपारी दोन वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीच्या सुध्दा एकूण आठ फेर्या होतील. ही गाडी ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी जंक्शन, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल आणि लखनऊ येथे थांबेल. या गाडीला 15 जनरल स्लीपर डब्बे, तीन जनरल डब्बे, दोन लगेज व गार्ड ब्रेक व्हॅन असतील.
