एस.टी.कर्मचार्‍यांचा आज संप मिटणार ? अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता !


ST STRIKE मुंबई : सुमारे चार महिन्यांपासून सुरु असलेला एस.टी.कर्मचार्‍यांचा संप आज मिटण्याची शक्यता असून विधानपरीषद सभापती बैठकीतून निघालेल्या तोडग्याबाबत सभागृहात माहिती देतील विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या निर्देशानुसार एस.टी.संपाबाबत आमदारांची समिती स्थापन करण्यात आली असून समिती स्थापन करुन आझाद मैदानात आंदोलन करणार्‍या कर्मचार्‍यांसोबत चर्चा करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या होत्या. त्यानुसार आमदारांची समिती स्थापन करण्यात आली होती. बुधवारी एस.टी.संदर्भात महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
या बैठकीला परीवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, शेकापचे जयंत पाटील, प्रविण दरेकर शेखर चन्ने बैठकीला उपस्थित होते.






कर्मचारी विलीनीकरण मागणीवर ठाम
एस.टी.कर्मचारी महामंडळ विलिनीकरणाच्या मागणीसाठी अजूनही ठाम आहेत मात्र यासाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. तोच अहवाल विधानसभेत पटलावर ठेवण्यात आला. एसटी कर्मचार्‍यांचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण शक्य नाही, असे अहवालात म्हटलं आहे. पगारवाढीचा निर्णय घेतल्यानंतरही विलीनीकरणाची मागणी लावून धरत एसटी कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे.

28 ऑक्टोबरपासून संप
28 ऑक्टोबरला एसटी कर्मचर्‍यांचा संप सुरू झाला होता. राज्याची जीवनवाहिनी असणार्‍या एसटीची वाहतूक गेल्या 100 दिवसांहून अधिक काळासाठी बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. या संपामुळे एसटी महामंडळाचे तब्बल 1600 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एसटीच्या 82 हजार 498 कर्मचार्‍यांपैकी 54 हजार 396 कर्मचारी अजूनही संपत सहभागी आहेत. एसटी कर्मचार्‍यांच्या आजवर सर्वाधिक काळ चाललेलला हा संप आहे.

एस.टी.महामंडळाला कोट्यवधींचा फटका
एस.टी.संपामुळे महामंडळाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी स्पष्टोक्ती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली होती. एस.टी.महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिककाळ सुरु असलेल्या या संपामुळे महामंडळाला कोट्यावधी रूपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !