महाजनादेश यात्रेतून आकडे फेकू नका लोकांचे प्रश्‍न सोडवा


खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

नाशिक : आकड्यांनी पोट भरत नाही तर धान्य पिकले तर पोट भरले, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना हाणला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, स्व.सुषमा स्वराज एकदा तत्कालिन अर्थमंत्री प्रणब मुखर्जीं यांना म्हणाल्या होत्या की ‘आँकडो से पेट नहीं भरता, पेट भरता है धान से’, या मुख्यमंत्र्यांना मला हेच सांगायचे आहे. महाजनादेश यात्रेतून फक्त आकडे फेकू नका तर लोकांचे प्रश्न सोडवा, असेही त्या संवाद यात्रेदरम्यान म्हणाल्या.

साहेबांनी केला शेतकरी हिताचा विचार
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांनी नेहमी शेतकरी हिताचा विचार केला मात्र आज सत्ताधारी हा विचार करताना दिसत नाहीत. शरद पवार कृषीमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले होते. जेव्हा सभागृहात कांद्याचा मुद्दा येत असे. त्यावेळी विरोधक साहेबांवर धावून जात असत. परंतु त्यांनी केवळ शेतकरी हिताचाच विचार केला. हेच विरोधक आज सत्तेत आहेत पण कांदा असो किंवा दूध त्यांचे दर वाढलेले आहेत. परंतु कोणीही काहीही बोलत नाही. शेतकर्‍यांचा विचार केला जात नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.


कॉपी करू नका.