केंद्राने कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी : रावेरात निवेदन
रावेर : केंद्र सरकारने जाहीर केलेली कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी, अशी मागणी रावेर तालुका काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देवून करण्यात आली. शेतकर्यांच्या विविध मागण्यांबाबाबत निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, जिल्हा कार्यध्यक्ष राजू सवणे, प्रतिभा मोरे, डॉ.शब्बीर शेख, सूर्यभान चौधरी, संतोष पाटील, रामदास लहासे, प्रकाश सुरदास, मनिषा पाचपांडे, अॅड.योगेश गजरे, विकास मराठे, संजय पाटील, काशीनाथ महाजन, भूषण पाटील, शांताराम पाटील, कैलास महाजन, डॉ.धनराज महाजन आदींच्या स्वाक्षर्या आहेत.


