सूर्यवंशी बंधूंच्या कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ


भुसावळ : व्याजाने दिलेल्या पैशांच्या कारणावरून झालेल्या वादानंतर रीपाइंचे जळगाव जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी आणि त्यांचे भाऊ अनंत सूर्यवंशी यांनी बंदुकीच्या धाकावर धमकावत एक लाख 60 हजारांचे दागिने हिसकावल्याचा आरोप तक्रारदाराने केल्याने वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर शुक्रवार 12 रोजी रात्री पोलिसांनी कोम्बिंग करीत दोघा बंधूंना अटक करण्यात आली होती व न्यायालयाने त्यांना 16 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी पुन्हा भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्या.मानकर यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !