ईव्हीएम मशीनद्वारेच विधानसभा निवडणुका होणार


मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची मुंबईत माहिती

मुंबई : निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुका या बॅलेट पेपरवर न होता ईव्हीएमवरच होतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बॅलेटपेपरची मागणी करणार्‍या राजकीय पक्षांना मोठा झटका बसला आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी महाराष्ट्रातल्या काही राजकीय पक्षांनी केली होती मात्र बॅलेटपेपर इतिहासजमा झाले आहे. आता ईव्हीएमवरच निवडणूक घेण्यात येईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परीषदेत स्पष्ट केले. दरम्यान, ईव्हीएम मशिनचे समर्थन करताना ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो, मात्र त्या मशिनसोबत छेडछाड होणे शक्य नाही, असेही अरोरा यांनी म्हटले आहे. काही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे की दिवाळीनंतर निवडणूक घ्या, याबाबत विचार केला जाईल असे सांगताना सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी आलेल्या पुराचाही उल्लेख त्यांनी केला.


कॉपी करू नका.