छगन भुजबळांनी पालकमंत्रिपदाचा अखेर हट्ट सोडला

सिंहस्थापूर्वी कामे मार्गी लागणे महत्त्वाचे, त्यासाठी पालकमंत्रिपद हवे असे नाही


It is important to get things done before the Simhastha, but it is not necessary to have the Guardian Minister’s post for that. नाशिक (16 जून 2025) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी कामे मार्गी लागणे महत्वाचे आहे. त्यासाठी पालकमंत्रिपद हवेच, असे काहीही नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हणत पालकमंत्री पदावरील आपला हट्ट सोडला आहे.

नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी महायुतीच्या घटकपक्षांत मतभेद निर्माण झालेत. सरकारने प्रारंभी या जिल्ह्याचे पालकत्व भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे सोपवले पण त्यामु्ळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना नाराज झाली. शिवसेनेला हे पद आपले नेते दादा भुसे यांच्यासाठी हवे होते त्यामुळे सरकारने महाजन यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा सरकारमध्ये समावेश झाला. त्यानंतर हे पद भुजबळांकडे जाईल, असे वाटत होते. पण आता भुजबळांनीही या शर्यतीतून अंग काढून घेतल्यामुळे हे पद गिरीश महाजन किंवा दादा भुसे या दोघांपैकी एकाला मिळण्याची शक्यता आहे.


छगन भुजबळ सोमवारी नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली. त्यात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, सिंहस्थापूर्वी कामे मार्गी लागणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी पालकमंत्रिपदच हवे असे नाही आणि पालकमंत्रिपदासाठी आपला हट्टही नाही.

उल्लेखनीय बाब म्हणजे नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद हा राजकीय प्रभाव, कुंभमेळ्यासाठी मिळालेला शेकडो कोटींच्या निधीवरील नियंत्रण व महायुतीतील अंतर्गत गटबाजी याचा परिणाम आहे. भुजबळांच्या माघारीमुळे हा वाद तात्पुरता शमला असला तरी, भविष्यात या प्रकरणी नव्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !