‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत 2.0’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात
डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचा उपक्रम
जळगाव (बुधवार, 5 ऑगस्ट 2026) : भारत सरकार आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तर्फे डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत 2.0’ या जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना नशा करणार नाही करू देणार नाही ही शपथ देण्यात आली.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश चंद्रसेन तयाडे हे होते. यावेळी उपप्राचार्य मोहन देविदास सूर्यवंशी, डॉ अशोक चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. नोंगमैथेम ज्ञानेश्वर सिंह व रमाकांत देविदास चौधरी यांनी कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय केले.
युवकांमध्ये अमली पदार्थ आणि विविध व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना निरोगी, सकारात्मक आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी उपस्थित सर्वांनी अमली पदार्थ, तंबाखूजन्य पदार्थ व इतर व्यसनांपासून दूर राहण्याची तसेच समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याची सामूहिक शपथ घेतली.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ.शैलेश तायडे यांनी युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, कौशल्यविकास आणि सामाजिक बांधिलकी यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. उपप्राचार्य मोहन सूर्यवंशी यांनी विकसित भारताच्या निर्मितीसाठी निरोगी, सजग आणि जबाबदार युवकांची आवश्यकता अधोरेखित केली. विद्यार्थ्यांनीही विविध जनजागृती उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत ‘नशा मुक्त भारत’ अभियानाला बळकटी देण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
समाजामध्ये सकारात्मक संदेश पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. महाविद्यालय प्रशासन, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. व्यसनमुक्त युवक हेच विकसित भारताचे खरे आधारस्तंभ आहेत, असा संदेश यावेळी देण्यात आला.