मतदार एसआर मॅपिंग व जनगणनेची कामे करणार्या महिलांना सुरक्षा पुरवा
भुसावळचे शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांसह महिला आयोगाकडे मागणी
Provide security to women engaged in voter SR mapping and census work. भुसावळ (16 मे 2026) : राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार एसआर मॅपिंग आणि जनगणनेच्या कामात गुंतलेल्या महिला कर्मचार्यांसह इतर सर्व कर्मचार्यांना तातडीने सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महिला आयोगाला थेट निवेदन पाठवून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
शिशिर जावळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मतदार नोंदणी, पडताळणी, एसआर मॅपिंग आणि जनगणनेचे काम अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे आहे. हे काम करण्यासाठी कर्मचार्यांना, विशेषतः महिला कर्मचार्यांना, दुर्गम भाग, संवेदनशील परिसर आणि घराघरांमध्ये जाऊन माहिती गोळा करावी लागते.
अनेकदा मैदानी पातळीवर काम करत असताना या कर्मचार्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. काही ठिकाणी नागरिक सहकार्य करत नाहीत, तर काही संवेदनशील भागात कर्मचार्यांशी हुज्जत घालणे किंवा त्यांना धमकावण्याचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कर्मचार्यांमध्ये विशेषतः महिला कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते.
महिला कर्मचार्यांना प्राधान्याने सुरक्षा
घरोघरी जाऊन सर्व्हे करणार्या महिला कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी. संवेदनशील भागात त्यांच्यासोबत पोलीस संरक्षण किंवा स्थानिक प्रशासनाचे सहाय्यक असावेत.
हेल्पलाईन व समन्वय कक्ष
कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी जिल्हा पातळीवर 24 तास कार्यरत असणारी विशेष हेल्पलाईन सुरू करावी.
स्थानिक प्रशासनाचे सहकार्य
पोलीस दल आणि स्थानिक प्रशासनाने या कर्मचार्यांच्या कामाच्या वेळा आणि परिसराची दखल घेऊन गस्त वाढवावी.
मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी
शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी हे देशाच्या आणि राज्याच्या विकासात्मक कामाचा कणा आहेत. मतदार मॅपिंग आणि जनगणनेचे काम राष्ट्रीय कर्तव्याचा भाग आहे. हे काम निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात तातडीने हस्तक्षेप करावा आणि कर्मचार्यांना पोलीस सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी शिशिर जावळे यांनी केली आहे.
या मागणीमुळे आता राज्य सरकार आणि गृह विभाग या कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी काय पावले उचलणार, याकडे सर्व कर्मचार्यांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केलेल्या प्रमुख मागण्या
शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केवळ तक्रार न करता, यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी खालील मागण्यांचे जाहीर पत्रक सादर केले आहे:
संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त- ज्या भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, तिथे कर्मचार्यांसोबत किमान एक पोलीस कर्मचारी किंवा स्थानिक होमगार्ड तैनात असावा.
महिला कर्मचार्यांसाठी ’विशेष पथके’ महिला कर्मचार्यांना एकटे न पाठवता दोन किंवा तीन जणांच्या समूहात काम करण्याची परवानगी द्यावी आणि स्थानिक प्रशासनाने त्यांच्यावर लक्ष ठेवावे.
24/7 आपत्कालीन हेल्पलाईन कर्तव्यावर असताना कोणत्याही कर्मचार्यासोबत गैरप्रकार घडल्यास तात्काळ मदतीसाठी जिल्हास्तरावर एक स्वतंत्र ईर्मजन्सी कंट्रोल रूम सुरू करावी
स्थानिक पोलीस गस्त वाढवणे
ज्या भागात हे सर्वेक्षण सुरू आहे, तिथे स्थानिक पोलिसांनी दिवसाची गस्त वाढवावी.
कर्मचार्यांचे मनोबल वाढवणे ही सरकारची जबाबदारी !
शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आणि अंगणवाडी सेविका हे या राष्ट्रीय कामांचे मुख्य आधारस्तंभ आहेत. जर त्यांनाच सुरक्षित वाटले नाही, तर कामाचा दर्जा आणि अचूकता धोक्यात येईल. गृहखात्याची धुरा सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर विषयात स्वतः लक्ष घालून कर्मचार्यांचे मनोबल वाढवावे आणि त्यांना पूर्ण सुरक्षा सुनिश्चित करावी.
शिशिर जावळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच ही मागणी लावून धरल्यामुळे शासकीय कर्मचारी संघटनांमधून या मागणीचे जोरदार स्वागत होत आहे. आता यावर राज्य सरकार आणि गृह विभाग काय पावले उचलणार आणि या मैदानी कर्मचार्यांना सुरक्षिततेचा काय दिलासा मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








