भुसावळच्या गँगमन तरुणांचा महामार्गावर अपघाती मृत्यू
महामार्गावर अपघातांचे सत्र कायम : अपघातानंतर वाहन चालक पसार
भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावर भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने शहरातील रेल्वेत गँगमन म्हणून असलेल्या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. माळी भवनाजवळील उड्डाणपुलावर रविवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला. दरम्यान, महामार्गावर अपघातांचे सत्र कायम असून चार दिवसांपूर्वीच भुसावळातील सिंधी कॉलनीतील भावंडाचा साकेगावजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाच रविवारी पुन्हा अपघात झाला.
दोघा तरुणांचा जागीच मृत्यू
समजलेल्या माहितीनुसार, साकेगावकडून भुसावळच्या दिशेने भुसावळातील तरुण दुचाकी (एम.एच.19 सी.टी.1102) ने येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने अल्फोउद्दीन बशिरोद्दीन शेख (24) व शेख शरीफ शेख इद्रीस (25, दोन्ही रा.ग्रीन पार्क, भुसावळ) या तरुणांचा डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने इतकी जोरदार धडक दिली की दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला.




अपघातामुळे वाहतूक ठप्प
माळी भवनापासून काही अंतरावर उड्डापणपुलावर रविवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अपघात झाल्यानंतर वाहतूक ठप्प झाली. बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, सहा.कृष्णा भोये, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, सहा.निरीक्षक अनिल मोरे, रवींद्र बिर्हाडे, दीपक पाटील, समाधान पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, कृष्णा देशमुख, चालक अय्याज सैय्यद आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवले. नगरसेवक पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, शेख आरीफ गनी, कृउबा सभाापती सचिन चौधरी आदींनी धाव मृतदेह पालिका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्याकामी मदत केली.
महामार्ग सुरू मात्र पथदिवे बंद
अपघात ज्या ठिकाणी झाला त्या भागात पथदिवे बंद असल्याने वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. गुरुवारी भुसावळच्या सिंधी कॉलनीतील मनीष दर्डा व रीतेश दर्डा हे भावंड जळगावहून भुसावळकडे येत असताना साकेगावजवळ ठार झाले होते. रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्राला उभा करण्यात आल्याने दुचाकी
त्यावर आदळून या भावंडाचा मृत्यू झाला होता.

