Big relief: Electricity workers’ strike finally over मोठा दिलासा : वीज कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे

महावितरणचे खाजगीकरण नाहीच : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


Big relief: Electricity workers’ strike finally over मुंबई : यशस्वी चर्चेनंतर वीज महावितरण कर्मचार्‍यांनी संप मागे घेतला असून राज्यातील वीज ग्राहकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपकर्‍यांच्या शिष्टमंडळाची चर्चा यशस्वी झाली व नंतर संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. महावितरणचे खासगीकरण थांबवण्यात यावे या मागणीसाठी 32 कर्मचारी संघटना या संपात उतरल्या होत्या.

सकारात्मक चर्चा : देवेंद्र फडणवीस
काल रात्रीपासून आपल्या विजेच्या तिन्ही कंपन्यांच्या कर्मचार्‍यांनी काही मागण्यांसंदर्भात संप सुरू केला होता. यात कंत्राटी कर्मचारी संघटनेचाही समावेश होता. यावेळी तीन-चार मुद्यांवर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. राज्य सरकारला या कंपन्यांचे कुठलेही खाजगीकरण करायचे नाही. या उलट पुढील तीन वर्षांत या तीन कंपन्यांमध्यये 50 हजार कोटींची गुंतवणूक राज्य सरकार स्वतः करणार आहे. यामुळे आपले अ‍ॅसेट्स कुणाला देण्याचा अथवा अशा प्रकारे त्याचे खासगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

एमईआरसीचा निर्णय होणार : फडणवीस
फडणवीस म्हणाले, खरे तर, हा संप झाला तो म्हणजे पॅरलल लायसन्सिंगसंदर्भात. विजेच्या कायद्यात पॅरलल लायसन्सिंगची एक व्यवस्था आहे. यासंदर्भात एमईआरसीकडे नुकतेच एका खाजगी कंपनीने प्रायव्हेट लायसंन्सिंगसाठी अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात, या सर्वच संघटनांचे म्हणणे होते की, महाराष्ट्र सरकारच्या कंपन्यांनी यासंदर्भात कंटेस्ट करणे आवश्यक होते. कारण पॅरलल लायसन्स आल्यानंतर, त्याचा परिणाम आपल्या कंपन्यांवर होऊ शकतो. मात्र, यासंदर्भात मी त्यांना (संपकर्‍यांना) आश्वस्त केले आहे, की आता जे नोटिफिकेशन काढले होते, ते त्या खासगी कंपनीने काढलेले नोटिफिकेशन आहे. आताची जी स्टेज आहे. त्या स्टेजला एमईआरसी या संदर्भातील नोटिफिकेशन काढेल. यानंतर, त्यासंदर्भात ऑब्जेक्शन घेऊ आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होमार आहे? त्यामुळे काय नुकसान होणार आहे? यासंदर्भात आपली सर्व भूमिका मांडली जाईल. याशिवाय, या कायद्यातील सर्व आयुधांचा वापर करून आपल्या कंपनीच्या हितासाठी एमईआरसीचा निर्णय व्हायला हवा यासाठी पुढाकार कंपनीच्या माध्यमाने आणि राज्य सरकारच्या माध्यमाने घेतला जाईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले.

कंत्राटी कर्मचार्‍यांसाठी खास घोषणा –
याचबरोबर कंत्राटी कामगारांसंदर्भात त्यांना अ‍ॅडीशनल मार्क देऊन येणार्‍या भरती प्रक्रियेत स्पेशल केस म्हणून राज्य सरकार वयात रिलॅक्सेशल देऊन त्यांचा समावेश सेवेत कसा करून घेता येईल याला आपण प्राधान्य देणार आहोत, असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले आहे.


कॉपी करू नका.