Bhagat Singh Koshyari’ राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केली जवाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा

राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरीत काळ चिंतन, मननात घालविण्याचा पंतप्रधानांकडे व्यक्त केला मानस


Bhagat Singh Koshyari’s desire to leave the post of Governor of Maharashtra मुंबई : नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदातून मुक्त होण्याची इच्छा पंतप्रधांनांकडे व्यक्त केली आहे. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरीत काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस पंतप्रधानांना कळविल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे वाढली अडचण
कधी मुंबई-ठाण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य तर कधी छत्रपती शिवरायांबद्दल केलेले वक्तव्य असो त्यामुळे कोश्यारींवर विरोधकांनी नेहमीच जोरदार टिका केली शिवाय त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली. सावित्रीबाई फुले, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयीदेखील राज्यापालांनी आक्षेपार्ह विधाने केल्याने त्यांच्याविरोधात राज्यात संतापाची लाट उसळली तर त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली मात्र राज्यपालांविषयी त्यावेळी कुठलीही कारवाई झाली नाही.

पंतप्रधान भेटीत केली ही मागणी
झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही, असेही कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 


कॉपी करू नका.