तर अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माणाचा मार्ग लागू शकतो निकाली

महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज ; अ.भा.संत समितीची ‘श्रीराम जन्मभूमी न्याय विमर्श सभा
फैजपूर : अयोध्येतील श्रीराम मंदिराबाबतीत जे पक्षकार आहेत त्या सर्व पक्षकारांचे म्हणजे ऐकूण घेऊन श्रीराम मंदिराच्या अस्तित्वाबाबतीत सर्व पुरावे तपासायला न्यायालय तयार असल्याने श्रीराम मंदिर निर्माणीचा मार्ग लवकरच निकाली लागू शकतो, असा आशावाद दिल्ली येथील बैठकीत अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी व्यक्त केला. दिल्लीतील कन्व्हेंशन हॉल जंतरमंतर येथे अखिल भारतीय संत समितीच्या ‘श्रीराम जन्मभूमी न्याय विमर्श’ सभेत 10 रोजी ते बोलत होते.
मंदिर विषयाला प्राथमिकता दिल्याने समाधान
मध्यंतरीच्या कालखंडात श्रीराम मंदिराच्या जागेबाबत न्यायालयाच्या नकारात्मक भूमिकेमुळे देशभरातील संत-महंतांची नाराजी होती. त्यासंदर्भात संपूर्ण भारतभर ‘हुंकार रॅलीचे’ आयोजन करण्यात आले होते परंतु आता न्यायालय सकारात्मक असून 10 ऑगस्टपासून श्रीराम मंदिराच्या जागेबाबत दररोज सुनावणी घेण्यासाठी तयार झाले आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या श्रीराम मंदिराच्या विषयाला कोर्टाने आता प्राथमिकता दिली असल्याने दिल्लीतील बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले. बैठकीत श्रीराम मंदिराबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेबाबत समाधान व्यक्त करण्यात आले तर श्रीराम मंदिराचा प्रश्न प्रलंबित रहावा, लवकर निकाली निघू नये, अशी भूमिका घेणार्यांबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. संत महंतांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत संत समितीने भारतात समान नागरी कायदा लागू करावा, असे प्रयत्न करून समृद्ध भारताच्या निर्माणासाठी संकल्प करावा, असे ठरविण्यात आले.
याांची होती बैठकीला उपस्थिती
या बैठकीत भारतातील सर्व राज्यातील संत समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व महामंत्री तसेच विश्व हिंदू परीषदेचे सर्व केंद्रीय पदाधिकारी उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य अविचलदासजी महाराज, संत समितीचे प्रमुख निर्देशक श्रीमंत ज्ञानदेव सिंहजी महाराज, स्वामी परमानंद महारा, विश्व हिंदू परिषदेचे चंपतराय, दिनेशजी तसेच वरीष्ठ कायदेतज्ञ अॅड.सुब्रमण्यम स्वामी, महामंत्री जितेंद्रानंद सरस्वती उपस्थित होते. दरम्यान, नोव्हेंबर 2019 पर्यंत योध्येतील श्रीराम मंदिराचा प्रश्न मार्गी लागून मंदिर निर्माण कार्याला सुरुवात होईल, अशी अपेक्षा संत समितीला असल्याची माहिती अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय खजिनदार तथा फैजपूर येथील सतपंत संस्थानचे गादिपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी दिली.
