बिहारच्या 35 मजुरांचे नंदुरबारमध्ये अपहरण


35 Bihar laborers kidnapped in Nandurbar नंदुरबार : नंदुरबारमध्ये बिहारमधून आलेल्या 35 मजुरांच्या अपहरण करण्यात आले व नंतर मारहाण करीत जबरदस्ती एका ट्रकमध्ये कोंबण्यात आलं. संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

हमाली ठेक्याचा वाद उफाळला
नंदुरबार शहरात भारतीय अन्न महामंडळाचा हमाली ठेक्यावरून मोठा वाद उफाळला. या वादातून कामावर असलेल्या तब्बल 35 मजुरांचं अपहरण करण्यात आले. शिंदखेडा पोलीस ठाणे हद्दीत ही गाडी पकडण्यात आली. त्यानंतर गाडीसह आरोपींना पुन्हा नंदुरबार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. पोलिसांनी अतिशय धडाकेबाज कारवाई करत 35 मजुरांची सुटका केली. या प्रकरणात नंदुरबारमधील मोठमोठ्या नेत्यांची नावे आली आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळातदेखील चर्चांना उधाण आलं आहे.

बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल
दुसरीकडे याच वादातून तालुका पोलिस ठाण्यात भाजपचे माजी आमदार, इतर बडे नेते, शिवसेना, भाजपच्या माजी नगरसेवकांसह बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात दिव्य मराठीने ऑनलाईन वृत्त प्रसिद्ध केले आहे.


कॉपी करू नका.