आता जनताच यांना घरी बसवेल : जळगावात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड

0

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम पाटील यांच्यावर पक्षांतराचा आरोप करणार्‍यांवर टीका केली. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे इतके मोठे कार्यालय इथे उभे राहिले, हा इतका पैसा कुठून आणला? असा प्रश्न त्यांनी केला.

शेतकरी हितासाठी कर्जमाफी करणार्‍या शरद पवार यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निवडणूक आता जनतेने हाती घेतली असून जनता आता विरोधकांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी आलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर जोरदार टिका केली.

या नेत्यांचा शक्ती प्रदर्शनात सहभाग
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवतीर्थ मैदानावर जमलेल्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व त्यानंतर सजवलेल्या बैलगाडी व ट्रॅक्टरमधून श्रीराम पाटील आणि करण पाटील या दोन उमेदवारांसह शक्ती प्रदर्शन करीत रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाली. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड, उमेदवार श्रीराम पाटील, करण पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.रोहिणी खडसे, प्रसेनजीत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.