शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : कुर्हाकाकोड्यातील सभेत मान्यवरांचा सूर
रावेर ऐवजी अंतुर्ली भागातून प्रस्तावित महामार्गासाठी लोकप्रतिनिधींची संमती : विनोद तराळ यांचा आरोप
कुर्हाकाकोडा : बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग रावेर ऐवजी अंतुर्ली परिसरातून नेण्यासाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनीच दोन वर्षांपूर्वी संमतीपत्र दिले होते, असा खळबळजनक आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य विनोद तराळ यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ कुर्हाकाकोडा येथे प्रचार रॅलीचे करण्यात आले.
शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
यावेळी झालेल्या सभेत विद्यमान लोकप्रतिनिधींनी शेतकर्यांच्या प्रश्नाकडे केल्याचा आरोप करण्यात आला. केळी विम्याचा प्रश्न त्यांना सोडविता आला नसल्याने हजारो शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित आहे. तसेच अंकलेश्वर-बर्हाणपूर महामार्ग रावेर शहरातून जातो मात्र नव्याने प्रस्तावित असलेला तळोदा बर्हाणपूर हा महामार्ग पूर्वीच्या महामार्गाने रावेर शहरातून न नेता अंतुर्ली शिवारातून नेण्यात येत आहे. यासाठी सर्वप्रथम श्रीराम पाटील यांनी आंदोलन केले तसेच अंतुर्ली परिसरातून महामार्ग नेण्याला शेतकर्यांनी विरोध केला आहे. त्यावेळी रक्षा खडसे यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती मात्र या महामार्गाच्या प्रस्तावित मान्यतेसाठी दोन वर्षांपूर्वी विद्यमान लोकप्रतिनिधींनी संमती पत्र दिले होते, असा खळबळजनक आरोप विनोद तराळ यांनी केला आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष अॅड.रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्या पाटील, उमेदवार श्रीराम पाटील, डॉ.जगदीश पाटील, दशरथ कांडेलकर, एजाज मलिक, दिनेश पाटील, यु.डी.पाटील, रवींद्र दांडगे, संजय पाटील, डॉ.बी.सी.महाजन, माणिकराव पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.