मनोज जरांगे स्पष्टच बोलले : आम्ही राजकारणात आल्यास हाल होतील !


जालना (6 ऑगस्ट 2024) : आम्ही राजकारणात उतरलो तर हाल होतील, असा सज्जड इशारा मराठा समाजाते नेते मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. आम्हाला राजकारणात उतरायचे नाही मात्र सरकारने आता आरक्षण न दिल्यास दुसरा पर्याय नाही. तसेच राज्यभरातील मराठा समाजाच्या आमदारांनी सरकारला समजावून सांगावे, असे आवाहनही त्यांनी माध्यमांशी बोलताना केले.

आंदोलन करायला लावण्यासाठी हे एक षडयंत्र
मनोज जरांगे म्हणाले की, सर्व जण स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी माझ्यावर तुटून पडले आहेत. मग ते भुजबळ यांच्यासारखे ओबीसी नेते असो किंवा भाजपचे मराठा आमदार, हे सर्व षडयंत्र आहे. आंदोलन करायला लावण्यासाठी हे एक षडयंत्र आहे”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. सध्या काही लोकांकडून समाजाला उचकवण्याचे काम सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.

… तर ही सरकारला अखेरची संधी
जरांगे म्हणाले की, ”सगळ्याच पक्षातील मराठ्यांच्या आमदारांनी सरकारला समजावून सांगवे. आम्हाला राजकारणात जायचे नाही. त्यात आम्हाला ढकलू नका. ही सरकारला शेवटची संधी आहे. कारण आरक्षण देण्याचे केंद्र सत्ता असते. सध्या सत्ता त्यांची आहे. आम्हाला आरक्षण दिले नाही तर आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. 29 तारखेला याबाबत निर्णय होईल. मराठा समाजाला हीच राजकारणाला पायाखाली तुडवायची योग्य वेळ आहे असे वाटले तर निर्णय होईलच. कारण आमचाही नाईलाज असेल”, असे जरांगे म्हणाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !