चिमुकलीसोबत घातपाताचा संशय : पोलिसांना फोन करताच पुरलेला मृतदेह काढला बाहेर


नाशिक (13 मार्च 2025) : पाण्यात पडलेल्या मुलीचा मृत्यू होताच पित्याने मृतदेह घाईतच दफन केला मात्र आई येण्यापूर्वीच हा प्रकार घडल्याने आईने पोलिसांना माहिती दिल्यानंतर अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. वैष्णवी वळवी असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

काय घडले नाशिकमध्ये
पंचवटीच्या मखलमाबाद शिवारात एका शेतात खेळताना पाय घसरून विहिरीत पडून एक वर्षीय वैष्णवी मृत झाला. शेतमजुरांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून खासगी रुणालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. आई माहेरी गेलेली असल्यामुळे तिला येण्यास उशीर होणार असल्याचं वडील विकास वळवी यांनी घाईघाईत वैष्णवीचा मृतदेह स्मशानभूमीलगतच्या मोकळ्या जागेत पुरून टाकला. याबाबत म्हसरूळ पोलिसांना कुठलीही माहिती कळवण्यात आली नाही.

वैष्णवीचे आई वडील शेतमजूर आहेत. या दाम्पत्यामध्ये वाद सुरू असल्याने मुलीला आणि नवर्‍याला सोडून आई माहेरी निघून गेलेली होती. पतीने मुलगी विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची खबर दिल्यानंतर आईने मखमलाबाद येथे दुसर्‍या दिवशी सकाळी धाव घेत मंगळवारी 112 क्रमांक फिरवून पतीने मुलीचा खून करून विहिरीत फेकून दिल्याची माहिती कळवली. पती विकास वळवी यांचं कृत्य संशयास्पद असून मुलगी झाल्यापासून ते वाद घालत होते असा आरोप पत्नीने केला आहे.

तक्रारीनंतर पोलिसांनी मृतदेह पुन्हा जमिनीतून बाहेर काढण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला. या अर्जाबाबत कोर्टाने सरकारी पक्षाचे म्हणणं ऐकून घेत तहसीलदारांना आदेश दिले. 2 दिवसांपूर्वीच बालिकेचा मृत्यू झाला असून तिला जमिनीत पुरून अंत्यविधी करण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेह पुन्हा बाहेर काढत जिल्हा रूग्णालयात पोस्टमोर्टमला पाठवला. या चिमुरडीचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होणार आहे.

 


कॉपी करू नका.