मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
डॉ.उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांचे यश
जळगाव (8 मे 2026) : मद्याच्या अति सेवनामुळे आयुष्य विस्कळीत झालेल्या एका तरुणाच्या उपचाराला डॉ.उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी योग्य दिशा देत त्याला नवजीवन दिल्याची घटना समोर आली आहे.
धरणगाव तालुक्यातील देवीदास नामक 47 वर्षीय तरूणाला सतत मद्यपानाची सवय, वागण्यात अचानक बदल, अनियंत्रित बडबड, तसेच हातपाय थरथरणे अशा लक्षणांमुळे संबंधित तरुणाची मानसिक आणि शारीरिक स्थिती गंभीर बनली होती. कुटुंबीयांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तरुणाला तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी मानसोपचार विभागातील तज्ज्ञ डॉ. उमा चांदूरकर, डॉ. हिमांशू जाधव, डॉ. हुमेद महाडीक, डॉ. ऋचिता आटे, डॉ. देवांश गणात्रा, डॉ. रैशल श्रीवास्तव, डॉ. राठोड यांनी रूग्णाच्या प्रारंभी वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.


यामध्ये एमआरआय तपासणीसह विविध चाचण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर संबंधित तरुणाला अल्कोहोल युज डिसऑर्डर विथ एन्झायटी डिसऑर्डर असा आजार असल्याचे निदान करण्यात आले.निदानानंतर मानसोपचार विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने उपचाराची जबाबदारी स्वीकारली. या उपचारामध्ये औषधोपचारासोबतच समुपदेशन, मानसिक आधार आणि जीवनशैलीत बदल यावर विशेष भर देण्यात आला. सुरुवातीच्या काळात तरुणाला अस्वस्थता, चिडचिड, झोपेच्या तक्रारी जाणवत होत्या मात्र डॉक्टरांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि कुटुंबाच्या सहकार्यामुळे त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली.काही दिवसांच्या उपचारानंतर तरुणाच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसून आला.
हातपाय थरथरणे कमी झाले, अनावश्यक बडबड थांबली आणि मानसिक स्थैर्य मिळू लागले. विशेष म्हणजे, मद्यपानाची तीव्र इच्छा देखील नियंत्रणात आली. उपचाराला चांगला प्रतिसाद मिळाल्याने संबंधित तरुण आता पूर्णपणे व्यसनमुक्त झाला असून, तो पुन्हा सामान्य आयुष्य जगण्यास सक्षम झाला.आह
मद्याचे अतिसेवनाचा शरीरासोबत मानसिक आरोग्यावरही परिणाम
मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले की, मद्याचे अतिसेवन केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम करते. योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास अशा रुग्णांना पूर्णपणे व्यसनमुक्त करता येते. कुटुंबीयांचे सहकार्य, रुग्णाची इच्छाशक्ती आणि तज्ज्ञांचा योग्य मार्गदर्शन हा उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे.या यशस्वी उपचारामुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेल्याचे डॉ.ऋचिता आटे म्हणाल्या.
