पाळधीतील प्रौढाचा रिक्षा अपघातात मृत्यू

0

An adult in custody dies in a rickshaw accident धरणगाव : पाळधी येथील प्रौढाचा लग्नाला जाताना रिक्षा अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 20 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे घडली. भिवसन खंडू कोळी (50, रा.पाळधी, ता.धरणगाव) असे मयताचे नाव आहे.

ताबा सुटल्याने उलटली रिक्षा
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे भिवसन कोळी हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथे नातेवाईकांकडे लग्न असल्याने भिवसन कोळी हे शनिवार, 20 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता रिक्षाने निघाले. धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावाजवळून जात असतांना चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा उलटली. यात भिवसन कोळी हे दबले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी वाहनाने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी मयत घोषीत केले.


कॉपी करू नका.