आता परिवर्तन हीच जनतेची इच्छा : महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांची भावनिक साद

0

जामनेर : गेल्या दहा वर्षात मतदारसंघात फारसा विकास झालेला नाही त्यामुळे परिवर्तन घडावे हीच जनतेचीही इच्छा असल्याचे मत जामनेर तालुक्याचे जावई व महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा निवडणुकीतील उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी व्यक्त केले. श्रीराम पाटील यांची सासरवाडी जामनेर तालुक्यातील आहे. गुरुवारी पाटील यांनी जामनेर तालुक्यात प्रचार दौरा केला यावेळी त्यांनी मतदारांच्या भेटी घेत संवाद साधला. मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जामनेर तालुक्याचे जावई असलेल्या श्रीराम पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला. यावेळी परिवर्तन करण्याची इच्छा मतदारांनी यावेळी बोलून दाखविली.

या गावांना दिल्या भेटी
रावेर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने श्रीराम पाटील यांनी जामनेर तालुक्यातील प्रचार दौर्‍यात बेटावद बुद्रुक, बेटावद खुर्द , वाघारी, रांजणी, कापूसवाडी, देऊळगाव गुजरी, तोरणाला, तोंडापूर, फतेपूर, किन्ही, भारुडखेडा, वाकोद, पहुरपेठ, पहुर कसबे, पाळधी येथील ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के.पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, राष्ट्रवादीचे प्रमोद नाना पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना उबाठा गट पक्षाचे तालुकाप्रमुख अ‍ॅड.ज्ञानेश्वर बोरसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, शिवसेना उबाठा गटाचे राज्य संघटक राहुल चव्हाण पाटील, एस.टी.पाटील, डॉ.प्रशांत पाटील, विश्वजीत पाटील, प्रभाकर पाटील, मुलचंद नाईक, मदन जाधव, पुंडलिक पाटील, संदीप नेरिया, रोहन राठोड, राजेंद्र पाटील, योगेश भाई, सागर कुमावत, परमेश्वर जव्हारे, अविनाश पाटील, गोपाल कदम, भूषण गरुड, सुभाष ठोंबरे, विष्णू सोनवणे, संजय उंबरकर, धर्मराज पाटील यांच्यासह ग्रामस्थ व महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.