दोन पक्ष फोडल्याने मराठी माणसांच्या भावना दुखावल्या : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

0

Splitting the two parties hurt the sentiments of Marathi people: State President Jayant Patil जळगाव : भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष फोडल्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या भावना दुखावल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात दूध संघ शेतकर्‍यांना केवळ 24 रुपये लिटरचा भाव देतो मात्र पश्चिम महाराष्ट्रात शेतकर्‍यांना 34 ते 35 रुपये लिटरचा भाव दुधाला मिळतो. शेत मालाला कमी भाव देऊन शेतकर्‍यांची लूट करणार्‍या भारतीय जनता पक्षाला पराभूत करा, असे आवाहन जळगावात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी ते आल्यानंतर रॅली आटोपल्यानंतरच्या सभेत बोलत होते.

दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रावेर लोकसभा मतदार संघातून श्रीराम पाटील आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून करण पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.

खडसेंच्या विषयावर प्रदेशाध्यक्ष म्हणाले ; हा विषय जुना झाला
आमदार खडसे यांनी सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिला का ? असा प्रश्न माध्यमांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारल्यानंतर त्यांनी खडसेंचा विषय हा जुना झाल्याचे सांगत या विषयावर बोलण्याचे टाळले. नवीन काही असेल तर विचारा, असेही ते म्हणाले. पाच लाखांच्या फरकाने आमच्या उमेदवाराचा विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी जळगावात माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.


कॉपी करू नका.