देशातील जुमलेबाज सरकार जाऊ दे : शेतकर्‍यांचे सरकार येवू दे !

महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांनी घातले भवानी मातेला साकडे

0

जळगाव : देशातील जुमलेबाज सरकार जाऊ दे व शेतकर्‍यांचे महाविकास आघाडीचे सरकार येवू दे, असे साकडे महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी भवानी मातेला घातले. पिंप्राळा ग्रामस्थांच्यावतीने ग्रामदैवत श्री भवानीमाता यात्रोत्सवानिमित्त अक्षयतृतीयेच्या दिवशी बारागाडया ओढण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रोत्सवात महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांनी सहभागी यावेळी यांच्याहस्ते बारागाड्यांचे पूजनदेखील करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी पोलीस पाटील विष्णू पाटील, माजी नगरसेवक अमर जैन, राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, सागर सोमाणी, समाजसेवक आसिफ शेख, सतीश आप्पा मोरे, संजय सोमाणी, माजी नगरसेविका पार्वताताई भील, संभाजी ब्रिगडचे महानगराध्यक्ष संदीप पाटील, पिंप्राळा विकासाचे व्हाईस चेअरमन राहुल पाटील, जितू पाटील, निलेश पाटील, हरसिंग पाटील यांसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.