विनयभंगासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या, सहा लाख उकळले : त्रास असह्य झाल्याने जळगाव जि.प.च्या कंत्राटी कर्मचार्याने उचलले टोकाचे पाऊल
सुसाईड नोटमध्ये प्रकल्प संचालकांसह नऊ जणांवर केले गंभीर आरोप
न्यूज डेस्क । जळगाव (29 जानेवारी 2025) : जळगाव जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत (डीआरडीए) कंत्राटी कर्मचारी असलेल्या 46 वर्षीय प्रौढास बलात्कार तसेच विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकी देत सहा लाख रुपये उकळण्यात आले व त्यानंतरही संशयीतांनी चौकशी लावून छळ सुरूच ठेवल्याने अनिल बडगुजर (46) यांनी आत्महत्या केली. तत्पूर्वी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या नऊ जणांची नावे कुटूंबियांना पाठवली.
तो पर्यंत अग्निडाग देवू रनका
आत्महत्या करण्यापुर्वी अनिल हरी बडगुजर यांनी सुसाईड नोट लिहून आईवडील व भाऊ यांच्या मोबाईलवर पाठवली. सुसाईड नोट वाचून अनिलचे वडील हरी बडगुजर आणि भाऊ अमित बडगुजर हे दोघी तातडीने वाघ नगर येथील राहत्या घरी गेले. पण तोपर्यंत अनिल बडगुजर यांनी आत्महत्या केली होती. आरोपींवर कारवाई होईपर्यंत आपल्या मृतदेहाला अग्निडाग देवू नये, असेही सुसाईट नोटमध्ये नमूद आहे.
त्रासाला कंटाळून आत्महत्या
अनिल याला गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या विभागातील बचत गटातील महिला व कर्मचारी हे विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होते. तसेच स्थानिक समितीमध्ये अनिलच्या विरोधात तक्रारही केली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी महिला कर्मचारी यांनी सहा लाखांची मागणी केली. सुरूवातीला सहा लाख रुपये दिले परंतू त्यानंतर तक्रार मागे न घेता पुन्हा सहा लाखांची मागणी करण्यात आली. या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दोषींना अटक करण्यात यावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
सुसाईड नोट मध्ये म्हटले आहे की…
आई आण्णा मला माफ करा ह्या वयात मी तुम्हाला नाही ते दुःख देत आहे. पण खरचं मी आता खूप थकलो आहे, जेंव्हापासुन मला समजायला लागले तेव्हा पासून प्रत्येक संकटाला मी सामोरे गेलो, आज नाही तर उद्याचा दिवस माझा राहिलं, ह्या आशेवर जगत आलो. पण संकट माझा पिच्छा सोडायला तयार नाहीत, मला जगू वाटत होते. तुम्ही आहेत तो पर्यंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या होत्या. पण मी किती बदनशिबी माझ्याच इच्छा मी पूर्ण करु शकलो नाही. काय पाप केले होते काय माहित ? पण मी सर्वांचे चांगले होईल ह्याचं विचाराने जगत आलो, तरी माझ्या वाट्याला असे दुःख यावे, असे संकट यावे, मी माझ्या स्वतच्या. बुध्दीवर आज पर्यंत प्रगती केली पण काही लोकांना माझी प्रगती पाहीली गेली नाही, स्वतः च्या स्वार्थासाठी हरेश्र्वर भोई याने काही महिलांचा वापर केला.मला एक वर्षापूर्वी सर्व समजले होते पण मी दुर्लक्ष करत होतों. माझ्या मरणास हरेश्र्वर भोई यास जबाबदार धरण्यात यावे. राजु लोखंडे हे फक्तं पैश्यासाठी भोईचे ऐकत होते आणि माझे काही नुकसान केले, यांना फक्तं पैसा प्रिय आहे, पैश्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. भोईचे ऐकून शरद पाटील, संदिप खेडकर यांनी रुपाली पाटील, सुरेखा पाटील, कोमल जावळे, साधना देशमुख, सीमा पाटील यांनी माझी काही चूक नसताना खोट्या तक्रारी केल्यात, झऊ ना काही अधिकार नसतांना त्यांनी माझे वैयक्तिक बँक खातेचे तपशील सन 2020 पासून काढले. पण त्यात त्यांना काहिच आढळून आले नाही, कारण मी आलेल्या मानधन आणि माझ्या इतर व्यवसायावर सर्व व्यवहार करत होतो, त्यामुळे माझ्या आत्महत्येस हरेश्र्वर भोई, राजु लोखंडे, कोमल जावळे, सुरेखा पाटील, रुपाली पाटील, सीमा पाटील, साधना देशमुख, शरद पाटील, संदिप खेडकर यांना दोषी ठरवण्यात यावे व जोपर्यंत यांना अटक होत नाही, तो पर्यंत माझ्या देहास अग्नी डाग देण्यात येऊं नये ही माझी शेवटची ईच्छा, असे म्हटले आहे.