केळी उत्पादकांना मोठा दिलासा : केळी महामंडळासाठी 50 कोटीची तरतूद :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबई : राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला असून या महामंडळाच्या माध्यमातून केळी पिकाबाबत संशोधन करण्यात येणार आहे. या महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !